Sunday, 15 October 2017

समाज आणि देशाचा खरा चेहरा कधी दिसणार...???


समाज आणि देशाचा खरा चेहरा कधी दिसणार...???




मीडियाचा  असा दावा आहे की मीडिया  हा  समाज आणि  देशाचा आरसा आहे.  जे देशात, समाजात घडतं ते मीडियात दाखवलं जात. पण मीडियामध्ये समाजाचा आणि देशाचा जसाच्या तसा चेहरा दिसतो  का...??? तर याच उत्तर मला तरी 'नाही' अस वाटतं.  मला भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातील हा विरोधाभास दिसतो की, तत्कालीन समाजसुधारकांनी अत्यंत छोट्या प्रमाणात निर्माण केलेल्या वृत्तपत्राकाने मोठ्या प्रमाणात सामजिक चळवळी उभ्या केल्या.  मात्र आजच्या काळात मीडियाची विविध रुपे (प्रिंट, टी.व्ही. वेब),  मोठ्या प्रमाणात विस्तारली असूनही अगदी मोजक्या प्रमाणात सामाजिक चळवळी चालवण्याचा प्रयत्न मिडिया करत आहे.  गेल्या काही दशकभरात मिडिया क्षेत्र हे व्यावसायिक क्षेत्र झाल्याच दिसत आहे. सध्याच सरकार कशाप्रकारे काम करत आहे याची कल्पना सर्वांना आहेच. काही प्रसारमाध्यमांनी तर सरकारच्या वाईट  धोरणांना लपवण्याचा आणि सरकारच्या विरोधकांना अक्षरशः दाबण्याचा प्रयत्न केला आहे. अशी  गुलामगिरी पत्करुन  सरकारच्या  ताटाखालचे मांजर म्हणून काम करणाऱ्या काही प्रसारमाध्यमांच्या संस्था आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या  अशा सरकारच्या आडमुठे धोरणाखाली आजचा नवोदित पत्रकार घडत आहे. आज माझ्यासारखे अनेक तरुण -तरुणी मीडियाची आवड किंवा ध्येय घेवून प्रसारमाध्यमात काम  करण्याच्या उद्देशाने येत आहेत . समोरील सर्व आव्हाने आणि  समस्या जरी काही प्रमाणात कळत असल्या तरी या समस्या आणि आव्हानांच्या प्रलयकारी लाटांवर स्वार होऊन सामजिक जबाबदारी आणि कर्तव्याबद्दलची प्रमाणिकता यांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करणार. 




शेवटी या साऱ्याच्या केंद्रस्थानी आहे तो सामान्य माणुस. सामान्य माणसाचे प्रश्न आहेत तरी काय? आज भारतात  सुशिक्षित बेरोजगारी, दरिद्रय, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण विकास, महिला सबलीकरण यांसारखे अनेक प्रश्न विकासाच्या आड येत आहेत.  याबद्दलची समाजातील  वास्तविकता  प्रसारमाध्यमांमार्फ़त निदर्शनास यावी यासाठी प्रसारमाध्यमात बॉलीवुड, राजकीय, विज्ञान-तंत्रज्ञान, इ. सारखी बिट्स आहेत अगदी तसच बेरोजगारी आणि ग्रामीण विकास या बिट्स वर स्वतंत्र काम करणारे करस्पॉण्डन्स हवे आहेत. यामुळे ग्रामीण विकास आणि बेरोजगारी   यांसारख्या प्रश्नाचे खरे वास्तव समोर येवून सकारात्मक परिणाम दिसु लागतील. आणि मगच मीडियामधे समाज आणि देशाचा  खरा  चेहरा दिसु लागेल.

2 comments:

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको  !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, ...